तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 

तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 

IMG-20240927-WA0520आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : खरीपातील लागवडीसाठी सुरवातीला समाधानकारक पाऊस पडल्यावर तुर,कपाशी,सोयाबीन अन्य खरीपातील पिके बहरात येवून शेतशिवार फुलले होते.त्यामुळे शेतकरी आनंदी होता.परंतु पोळ्या नंतरच्या परतीच्या पावसाने खरीपातील पिकाचे अतोनात नुकसान झाले.हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असताना आता शेतकर्याची चिंता वाढली असुन तुरीच्या तुर्हाट्या अण कापसाच्या वाती झाल्याचे चित्र सर्वत्र शेतात दिसत आहे.याबाबत महसूल,तसेच कृषी विभाग मात्र काळजी वाहु दिसत नसल्याने आता या झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान तर झालेच त्यामुळे पिक पाहणी,पंचनामे न करता खरिपातील सर्वच पिकाना सरसकट मदतीची याचना शेतकरी करत आहे.
याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ही शासनाकडे मागणी करत असल्याचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी सांगितले,नुकतीच त्यांनी खासदार डॉ.कल्याण काळे यांची भेट घेवुन खरिपातील नुकसान झालेल्या पिकाची सविस्तर माहिती देत सरकार कडुन शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मागणी केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान