गोमाल गाव हादरलं पाच वर्षाच्या चिमुकलीने घेतला अखेरचा श्वास ; मृत्यूचं कारण अस्पष्ट...
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
जळगाव जा : १७ सप्टेंबर रोजी गोमाल येथील जानकी विक्रम चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा गोमाल हादरलं.आठ दिवसा अगोदर गोलमाल मध्ये दोन बालकांसह एका तरूणीचा करून अंत झाला.ती घटणा ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा जानकी या चीमुकलीने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूचं कारण मात्र अद्यापही समजलं नाही.
जानकीचा मृत्यू कशाने झाला हे कोणी सांगू शकत नाही. 17 सप्टेंबर च्या मध्यरात्री जानकीला भल्या पहाटे जाग आली. तीला अस्वस्थ वाटत होतं.तीने आईला उठवले.त्या लहानग्या जीवाला वाटलेही नसेल की,मला न्यायला काळ आपल्या दारात तीची वाट पाहत असेल.तीने होणारा त्रास तीच्या आईला सांगितला.दोन तीन वेळा संडासला गेली.दोन तीन उलट्या केल्या.तीच्या आई वडीलांना काय करावे कळत नव्हते.तोवर दिवस उजेडायला आला होता.जानकीची प्रकृती एकदमच खालावली होती. दिवस निघता निघता तीला गावात सुरू असलेल्या आरोग्य शिबिरात नेले.पण तोवर जानकिची प्राणज्योत मालवली होती.ती जग सोडून दूर निघून गेली होती.कधीही परत न येण्यासाठी.डाॅक्टरांनी तीला तपासले असता जानकीचा अगोदरच मृत्यू झाल्याचे सांगितले. तिच्या हृदयाची धडधड केव्हाचीच बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जानकी आता या जगात नाही .ती सर्वांना सोडून दूर निघून गेली.आई-वडिल, आपल्या लहानग्या भावंडांना सोडून सातासमुद्रापार निघून गेली.तीच्या घराचं आंगन पोरक झालं.जीथ ती खेळत होती त्याच जागेवर आता तीची अंत्ययात्रा भरली होती.लोक रडत होते.आसवांना वाट मोकळी करून देत होते.जानकिचा अवाज आता कायमचा मुका झाला होता.ती शांत झोपी गेली होती .रात्रीच्या गडद अंधारात ती दिसेनाशी झाली होती.काळ्याकुट्ट रात्रीने तीला घेरलं होतं. उमलण्या अगोदरच नियतीने त्या कळीला चूरगाळून टाकले.
जानकीच्या जाण्याने सारं गाव हादरलं. जानकी चा मृत्यू कशाने झाला कुणालाच कळलं नाही. या अगोदरही गोमाल या आदिवासी गावात दोन बालकासह एका तरुणीला आपल्या प्राणास मुकावे लागले त्याचंही ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. मृत्यू कशाने होत आहे कुणी सांगू शकत नाही.पण निरापराध जीवांचा मात्र बळी जात आहेत.हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.
Comment List