महाराष्ट्र हदरला : डोळ्यात मिरचीपूड टाकत तलाठ्याचा भोकसून खून...
आधुनिक केसरी न्यूज
हिंगोली : वसमत तालुक्यातील आडगाव ( रंजे ) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाठ्याचा डोळ्यात मिरची पूड टाकत तलाठ्याचा भोकसून खून केल्याची खळबळजनक घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. व्हॉट्सअॅप चॅटवरुन झालेल्या वादातून हि घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संतोष पवार असे हत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रताप कराळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे.हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत होते. त्यावेळी आरोपी प्रताप कराळे या तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तलाठी पवार म्हणाले मी योग्यच टाकले जे टाकले आहे, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळेने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने सपासप वार केले. या घटनेनंतर आरोपी कराळेने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे म्हणत त्रास देत असायचा. मात्र, असे करता येत नसते असे वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Comment List