सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख अर्थसंकल्प
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारा असून तो सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख आहे. या अर्थसंकल्पात सरकारने विविध क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि उद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा, कृषी विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिले आहे, हे निश्चितच राज्याच्या प्रगतीस चालना देणारे आहे.
विशेषत: कृषी क्षेत्रासाठी अनुदाने, जलसंधारण योजनेसाठी वाढवलेले बजेट आणि ग्रामीण भागातील विकासावर दिलेला भर हे सकारात्मक पाऊल आहे. तसेच, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नवीन स्टार्टअप्ससाठी दिलेली प्रोत्साहने यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून त्यामुळे महाराष्ट्र निश्चितच प्रगतिपथावर वाटचाल करेल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List